अनुभव – वीरेंद्र
ही घटना साधारणतः 5 वर्षांपूर्वी माझ्या काका काकू सोबत घडली होती. मुंबई ला माझ्या मोठ्या मावस बहिणी चे लग्न होते. ठरल्या प्रमाण सगळे नातेवाईक मुंबई ला गेले पण काका काम असल्यामुळे नंतर वेळेवर जाणार होते. लग्नाच्या आदल्या रात्री काका आफिस मधले सगळ काम उरकुन संध्याकाळी लवकर घरी आले. घरातले सगळे काम आवरून रात्री 10 च्या सुमारास काका मुंबईला जायला निघाले. साधारण पावणे अकरा च्या सुमारास काकांची गाडी नाशिक मुंबई कसारा घाटाला लागली. घाट चढायला सुरुवात झाली होती. झोप लागू नये म्हणून काकांनी सौम्य आवाजात गाणी लावली होती. अर्धा तास उलटला असेल. सव्वा अकरा झाले असावेत.
गाडीच्या मागून पूढे जाण्यासाठी एका दुसऱ्या गाडीने पासिंग सिग्नल दिला. काकांनी पुढे जाण्यासाठी इंडिकेटर दिला. मागची टू व्हीलर पुढे आली. काकांच सहज लक्ष त्याकडे गेलं आणि त्यांची चांगलीच तंतरली. गाडीवर चालक तर होता पण त्याचं मुंडक दिसत नव्हतं. आपण काहीतरी चुकीचं पाहतोय आणि आपल्याला भास होतोय असा विचार करून त्यांनी गाडी पुढे नेली. काही वेळाने पुन्हा ती गाडी पुढे आली आणि त्यांना दिसले की या वेळेस त्या गाडीवर कोणीही नाही, गाडी स्वतःच आपोआप पुढे जात आहे. तो भयानक प्रकार पाहून ते इतके घाबरले की त्यांचा गाडीवरचा ताबा सुटू लागला. त्यांनी गाडी अगदी वेगात घेतली आणि त्याला ओव्हर्टेक करून पुढे जाऊ लागले. रात्री बरोबर बाराच्या सुमारास ते घाट उतारायला लागले.
तेव्हा कुठे त्यांना हायसे वाटले. साधारणता 3 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई ला पोहोचले. आल्या आल्या त्यांनी सगळा प्रकार आजोबांना सांगितला. आजोबांनी सांगितले की तिथे असे प्रकार पूर्वी खूप व्हायचे पण आता होतं नाहीत. त्यामुळे तुला हा अनुभव कसा आला हे मला ही माहित नाही. तिथे बरेच अपघात आले आहेत, एका अपघातात दुचाकी स्वराचा भीषण अपघात होऊन त्याचे मुंडके ट्रक खाली आले होते पण धड तसेच होते, धड बराच वेळ झटपट त होते. तेव्हा पासून मुंडके नसलेल्या दुचाकी स्वराचे भुत त्या भागात दिसते असे मी ऐकले होते. या घटने नंतर काका नाईट ड्राइव्ह करायचे शक्यतो टाळतो. अगदीच नाईलाज झाला तरच तो नाईट ड्राइव्ह करतो.